माजी सैनिकानी व वीर पत्नी,वीर मातानी शहीद स्मारकाला पुष्प चक्र अर्पण करून शौर्य दिन आठवण करून दिली.

भारतीय मीडिया फाउंडेशन सांगली जिल्हा माजी सैनिक फॉर्म कमिटीच्या वतीने शौर्य दिन साजरा
29 सप्टेंबर 2016 रोजी भारतीय जाबाज सैनिकांनी पाकिस्तान सिमेमध्ये मध्ये घुसून आतंकवादी शिबिरांना उध्वस्त करून आतंकवादीना धडा शिकवला. व
भारताचे स्वातंत्र्य टिकवून ठेवण्यासाठी सैनिकांनी आपल्या प्राण पणाला लावून त्या दिवशी झालेल्या सर्जिकल स्ट्राइक केली
.त्याची आठवण म्हणून 29 सप्टेंबर हा दिवस शौर्य दिन म्हणून साजरा करण्यात येतो या दिवसाचे महत्त्व व आपल्या सैनिकांच्या सर्वोच्च बलिदानाला सर्वोच्च त्यागाला नमन करत श्रद्धांजली देत. आज सांगलीतील त्रिकोणी बाग मध्ये शहीद स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करत श्रद्धांजली वाहिली यावेळी मोठ्या संख्येने स्वाभिमानी माजी सैनिक व वीर पत्नी वीर माता उपस्थित होत्या धन्यवाद?